केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचे उपसंचालक राजेशकुमार शाह यांनी २३ मे २०२२ रोजी राज्याच्या मुख्य सचिवांच्या नावे नवी दिल्लीच्या सेना भवनातून पत्र काढले. यात त्यांनी छावणी परिषदांचे महापालिकांमध्ये विलीनीकरण करण्याबद्दलचा उल्लेख केला असून, याबद्दल राज्य सरकारने आपली भूमिका कळवावी, असे नमूद केले आहे. उपसंचालकांच्या पत्राचा संदर्भ देऊन राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने आठ जुलै २०२२ रोजी पुणे, खडकी, देवळाली, नगर, औरंगाबाद, देहू आणि कामठी येथील छावणी बोर्डाच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावे पत्र काढून मुख्याधिकाऱ्यांना अहवाल देण्याचे आदेश दिले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/O8KBaXM
https://ift.tt/8vHtB9c
0 Comments