name plate

name plate

८३: खेळ 'अचूक' मांडला

‘त्या रात्रभर कुणीही झोपलं नाही. संपूर्ण देशासाठी तो असा आनंदी क्षण होता, की शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आम्हा कुणालाही भुकेची पर्वा नव्हती आणि रात्री भूक लागली, तेव्हा जेवण संपलं होतं. त्या विजयाच्या रात्री सर्व जण रिकाम्या पोटी होतो. मन मात्र भरलेलं होतं,’ चित्रपटाच्या क्लायमॅक्सḤच्या दृश्यानंतर तत्कालीन कर्णधार कपिल देव स्क्रीनवर येऊन हे सांगḤतात, तेव्हा आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आजपासून ३८ वर्षांपूर्वीचा विजयाचा आणि प्रचंड आनंदाचा क्षण... त्या क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय क्रिकेट संघानं केलेला संघर्ष. कोट्यवधी भारतीयांसाठी अविश्वसनीय वाटावी अशी स्वप्नपूर्ती, भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील मानाचं पान कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ या सिनेमात पाहायला मिळतं. तीन दशकांहून अधिक काळापूर्वीचा तो भारावून टाकणारा माहोल पुन्हा जागवण्यासाठी जे जे आणि जितकं करणं गरजेचं होतं, ते सर्व काही दिग्दर्शक कबीर आणि त्याच्या टीमनं ‘८३’ चित्रपटात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. १९८३मध्ये भारतीय क्रिकेट संघानं ऐतिहासिक कामगिरी करून दाखवत विश्वविजेतेपद पटकावलं होतं. स्वतःवर आणि आपल्या संघावर कपिल देव यांना पूर्ण विश्वास होता; म्हणूनच ते त्यांच्या खास इंग्रजी शैलीत स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पत्रकारांना बेधडकपणे म्हणाले होते, ‘वी हिअर टू वीन...’ कपिल यांचं हे भाकीत खरं कसं ठरलं? भारतीय संघाच्या या उत्कंठावर्धक प्रवासाचा साक्षीदार होण्याची संधी ‘८३’ हा सिनेमा प्रेक्षकांना देतो. कपिल यांची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या रणवीर सिंहला पाहताना, समोर मोठ्या पडद्यावर रणवीर हा कपिलच्या भूमिकेत आहे हे विसरायला होतं! आत्मविश्वास आणि ताकदीनं रणवीरनं कपिल यांची भूमिका साकारली आहे. कपिल यांची देहबोली, त्यांचं बोलणं रणवीरनं अगदी अचूक पकडलंय. परिणामी, ‘८३’ हा केवळ ‘सिनेमा’ म्हणून उरत नाही, तर त्या ऐतिहासिक विजयाचे जणू साक्षीदार होण्याचा आनंद आपल्याला मिळतो. कबीरची अभिनेत्यांची निवड अचूक ठरली आहे. सिनेमाचा पूर्वार्ध चटकन संपतो. उत्तरार्धात तो काहीसा रेंगाळतो. चित्रपटाच्या क्लायमॅक्सपूर्वी कथा पुन्हा वेग घेते आणि आपण स्वतः जणू लॉर्ड्सच्या पॅव्हेलियनमध्ये बसलो आहोत; असाच भास प्रेक्षकांना होतो. ज्या प्रेक्षकांना, खासकरून तरुणवर्गाला तत्कालीन खेळाडूंची तितकीशी ओळख नाही, त्यांना पात्रांची ओळख करून देण्यासाठी कबीर आणि संकलकाने चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक क्लृप्ती केली आहे. खऱ्या खेळाडूंचे पासपोर्टवरील छायाचित्र आणि त्या-त्या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार आपल्याला पडद्यावर दिसतात. सिनेमातील प्रत्येक ‘फ्रेम’ वाखाणण्याजोगी झाली आहे. सिनेमॅटोग्राफर असिम मिश्रा यांनी अतिशय कुशलतेनं प्रसंग कॅमेराबद्ध केले आहेत. मोजक्या ठिकाणी ‘रिअल व्हिज्युअल्स’ही दिसतात. कपिल यांची मुंगूस बॅट, त्या सोबत केलेली खेळी, नटराज शॉट, बॉलिंग स्टाइल हे सगळं अगदी लाजबाव आहे. सोबत, कपिल देव यांची १७५ धावांची ऐतिहासिक खेळीही पाहायला मिळते. संदीप पाटील (चिराग पाटील) आणि कपिल देव यांची मैदानातली फटकेबाजी पाहताना क्रिकेटप्रेमी इतिहासात रमतात. मार्शलचा वेगवान चेंडू जबड्याला लागल्यानं जेव्हा दिलीप वेंगसरकर (आदिनाथ कोठारे) यांना दुखापत होते. त्या क्षणाला स्वतः मॅनेजर पीआर मान सिंग (पंकज त्रिपाठी) दिलीप यांना रुग्णालयात एकटे घेऊन जातात. हे दृश्य पाहताना आजच्या काळातील खेळाडूंना मिळणाऱ्या सुखसुविधांशी त्याची नकळत तुलना होते. यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. चित्रपटातील प्रत्येक खेळाडू, त्याचं भावविश्व आणि त्याची कामगिरी पडद्यावर मांडताना कबीरनं प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कृष्णाम्माचारी श्रीकांत (जीवा) यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनोखा पैलू दिग्दर्शकानं पडद्यावर दाखवला आहे. जतिन सरना (यशपाल शर्मा), एमी विर्क (बलविंदर संधू) आणि हार्डी संधू (मदनलाल) यांनी उत्कृष्ट अभिनयानं सिनेमाची उंची वाढवली आहे. लाला अमरनाथ यांची व्यक्तिरेखा मोहिंदर अमरनाथ यांनी साकारली आहे. अभिनेता साकिब सलीमनं मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका उत्कृष्ट वठवली आहे. प्रेरणादायी, भावनिक आणि काहीसा विनोदी यांचा उत्कृष्ट मिलाफ सिनेमात पाहायला मिळतो. मैदानाबाहेरचा लंडनचा माहोल, भारतातला माहोल याचं चित्रणही चित्रपटात आहे. नवाबपूरमध्ये उसळलेली दंगलीची परिस्थिती आणि त्या घटनेला क्रिकेटशी कशा प्रकारे जोडण्यात आलं, यावरही सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे. अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन अशा सर्वच दृष्टीनं सिनेमा उत्कृष्ट आहे, सोबतच तो तांत्रिकदृष्ट्याही अव्वल आहे. कथानकाची पूर्वतयारी आणि संशोधनासाठी टीमनं घेतलेली मेहनत पडद्यावर ठायी ठायी दिसते. सिनेमातील गाणी आणि प्रसंग चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावरही हृदयात घर करून राहतात. दिग्दर्शक कबीर खाननं या सिनेमातून ‘मास्टर स्ट्रोक’ मारलाय, असं म्हणायला हरकत नाही. सिनेमा : ८३निर्मिती : , कबीर खान दिग्दर्शक : कबीर खान लेखन : कबीर-संजय-वसन कलाकार : , दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, एमी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री, नीना गुप्ता, बोमन इराणी, अदिती आर्या, वामिका गब्बी. दर्जा : साडेचार स्टार


from Entertainment News in Marathi: Celebrity News and Gossips Online | Maharashtra Times https://ift.tt/3ySWTAa
https://ift.tt/3yQzA9X

Post a Comment

0 Comments