नवी दिल्ली: ‘स्वातंत्र्यानंतर अनेक पुसून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. या चुका आता आम्ही सुधारत आहोत’, या शब्दांत यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ‘ ’ येथे होलोग्राम पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ( ) वाचा : पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षापर्यंत म्हणजे २०४७पर्यंत ‘नव्या भारता’चे स्वप्न साकार करण्यामध्ये जगातील कुठलीही शक्ती आड येऊ शकत नाही. नेताजींनी ‘आम्ही हे करू शकतो आणि करणार’ अशी प्रेरणा दिली. तरुणांनी त्यांच्याकडून शिकावे. दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतर देशाच्या संस्कृतीबरोबरच अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांचे योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात लक्षावधी नागरिकांचे योगदान होते; पण इतिहासाला मर्यादित ठेवण्याचे प्रयत्न झाले. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांनी ही चूक आपण सुधारत आहोत.’ यावेळी त्यांनी २०१९ ते २०२२पर्यंतचे ‘ ’ पुरस्कारांचे वितरण केले. वाचा : मोदी म्हणाले, ‘भारताच्या भूमीवर पहिले स्वतंत्र सरकार नेताजींनी स्थापन केले. त्यांचा भव्य पुतळा ‘इंडिया गेट’ येथे डिजिटल स्वरूपात उभारला जात आहे. या होलोग्राम पुतळ्याचे रूपांतर लवकरच भव्य ग्रॅनाइटच्या पुतळ्यामध्ये होईल. तरुणांना तो प्रेरणा देत राहील.’ होलोग्राम पुतळ्याची उंची २८ फूट आणि रुंदी ६ फूट आहे. ९० टक्के पारदर्शी होलोग्राफिक स्क्रीन अशा पद्धतीने उभारली गेली आहे, की ही स्क्रीन कुणाला दिसणार नाही. वाचा :
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fQtYUt
https://ift.tt/35aDAY1
0 Comments