name plate

name plate

चारा घोटाळ्याबाबत मोठी बातमी; लालूंचे टेन्शन वाढले, तब्बल २६ वर्षांनंतर...

रांची: चारा घोटाळ्यातील प्रकरणी दाखल खटल्याची सुनावणी आज पूर्ण झाली. याप्रकरणी विशेष न्यायालय येत्या १५ फेब्रुवारी रोजी आपला निर्णय सुनावणार असून या निकालाकडे देशाचे लक्ष असणार आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो यांच्यासह ११० जणांवर या प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेले आहेत. ( ) वाचा : प्रकरणात लालू यांना शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर ते १९ मार्च २०१८ पासून कारागृहात शिक्षा भोगत होते. गेल्या १७ एप्रिल रोजी त्यांना झारखंड हायकोर्टाने जामीन दिला होता. त्यानंतर प्रत्यक्षात ३० एप्रिल रोजी त्यांची कारागृहातून सुटका झाली होती. आता चारा घोटाळ्यातीलच डोरंडा कोषागार प्रकरणाचा निकाल येणार असल्याने लालूंच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. विशेष सीबीआय कोर्टात या खटल्याची सुनावणी आज पूर्ण झाली. त्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवत १५ फेब्रुवारी ही तारीख निकालासाठी निश्चित केली. या प्रकरणात लालूप्रसाद यांच्यासह जगदीश शर्मा, डॉ. आर. के. शर्मा, ध्रुव भगत, पाच आयएएस अधिकारी, ३० पशु वैद्यकीय अधिकारी, सहा लेखापाल, ५६ पुरवठादार यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. या कोषागारात १३९.३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून सीबीआयने सुरुवातीला १७० जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यातील १४७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. २६ वर्षांपासून हा खटला सुरू असून बिहारचे माजी मुख्यमंत्री यांच्यासह ३७ आरोपींचे आतापर्यंत निधन झाले आहे. वाचा: चारा घोटाळा प्रकरणी पाच वेगवेगळे दावे रांची येथील सीबीआय कोर्टात लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्ध चारा घोटाळा प्रकरणी पाच वेगवेगळे दावे दाखल करण्यात आले होते. त्यातील चार खटल्यांचा निकाल लागला असून सर्वच प्रकरणात लालूंना शिक्षा सुनावली गेली आहे. आता पाचव्या आणि अंतिम खटल्याच्या निकालाची तारीख आज निश्चित झाली आहे. हे सर्वात मोठे प्रकरण असून लालूंना दोषी ठरवून शिक्षा सुनावली जाणार की दिलासा मिळार हे आता १५ फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे. वाचा :


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://bit.ly/3GdtNxp
https://bit.ly/3AEX9nb

Post a Comment

0 Comments