name plate

name plate

'मनमोहन सरकार असल्याचा पाकचा समज झाला आणि...'; शहांचे मोठे विधान

ग्रेटर नोएडा: उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण तापू लागलं असून केंद्रीय गृहमंत्री यांनीही प्रचाराचा धडाका लावला आहे. आज शहा यांनी गौतम बुद्धनगरात डोअर टू डोअर प्रचार केला तर ग्रेटर नोएडा येथील शारदा विद्यापीठात मतदार संवाद कार्यक्रमातही सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पाकिस्तानवरच्या सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करत माजी पंतप्रधान यांना टोला लगावला. काँग्रेससोबतच शहा यांनी सपा व बसपालाही लक्ष्य केले. ( ) वाचा : उत्तर प्रदेशची लढाई भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे. अमित शहा हे आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार शब्दांत निशाणा साधला. केंद्रातील मोदी सरकारने वेळोवेळी घेतलेल्या कणखर भूमिकेचा दाखला देत त्यांनी विरोधकांवर तोफ डागली. ' आणि उरी हल्ल्यानंतर भारत काय करणार, असा पाकिस्तानचा समज झाला होता. भारतात मनमोहन सिंग यांचेच सरकार आहे असे पाकिस्तानला वाटले होते. येथे आता मोदी सरकार आहे याचा विसर त्यांना पडला होता. हा त्यांचा समज आम्ही दूर केला आणि त्यांना अद्दल घडवली. दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या दहा दिवसांच्या आत पाकिस्तानवर सर्जिकल स्टाइक करत आपल्या जवानांनी बदला घेतला. हे धाडस केवळ मोदींचे सरकारच करू शकते', असे नमूद करत शहा यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली. केंद्रात काँग्रेसचे सरकार होते तेव्हा त्यांना सपा-बसपाचा पाठिंबा होता. त्यांच्या काळात राजरोस दहशतवादी हल्ले व्हायचे. आपल्या जवानांचे शीर नेण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती तरी दिल्लीला त्याचे काहीच सोयरसुतक नसायचे. तो काळ आता संपला आहे. आता शत्रुला चोख प्रत्युत्तर दिलं जातं आहे, असेही शहा पुढे म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० हटवण्याचे आणि ३१ ए उखडून फेकण्याचे ऐतिहासिक काम केले असताना याच काँग्रेस, सपा-बसपाने त्याला विरोध केला होता, अशी टीकाही शहांनी केली. कश्मीरमध्ये दगड तर सोडाच साधा खडा फेकून मारण्याचीही कुणाची हिंमत आता होणार नाही, असे शहा यांनी बजावले. भारत ही काही धर्मशाळा नाही, असा इशाराही त्यांनी दिला. वाचा : अखिलेश यांच्या पोटात का दुखतं? उत्तर प्रदेशातील 'बाहुबली' नेत्यांवर भाजप सरकार कारवाई करत असेल तर त्याने यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय?, असा सवाल अमित शहा यांनी केला. सत्तेत असताना जे वीज देऊ शकले नाहीत ते आता मोफत वीज देण्याची आश्वासने देत आहेत. यावर जनता विश्वास ठेवणार नाही, असा टोलाही शहा यांनी अखिलेश यांना हाणला. योगींनी पाच वर्षे स्वच्छ शासन चालवलं. सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. त्यांच्यावर राहुल गांधी वा अखिलेश यादव हेसुद्धा याबाबत आरोप करू शकणार नाहीत, असेही शहा म्हणाले. वाचा:


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3KP9D08
https://ift.tt/3KPexdG

Post a Comment

0 Comments