हिंगोली : केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी हिंगोली जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्यानुसार, विना परवाना वाहन चालविल्या प्रकरणी एका वाहन चालकास तब्बल पाच हजार रुपयाचा दंड लावण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे वाहन चालकांना चांगलेच महागात पडणार आहे. देशात आणि राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याला एकमेव कारण म्हणजे वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. तसेच अल्पवयीन मुलेसुद्धा वाहने चालवताना निदर्शनास आले. विना परवाना, विना नंबर प्लेट, भरधाव व विना हेल्मेट, वाहन चालविण्याचे प्रकार वाढत आहेत. माञ, दंडाची रक्कम कमी असल्यामुळे नियम मोडले तरी रक्कम भरून वाहनचालक सुटका करून घेत होते. त्यामुळे वाहतूक नियमांचा बोजवारा उडत होता. अपघाताच्या वाढत्या घटना व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी केंद्राने मोटार वाहतूक कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कायद्यात सुधारणा करून दंडाच्या रकमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. याबाबतची अंमलबजावणीही देखील सुरू झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातही ११ डिसेंबरपासून नियमानुसार दंडात्मक कार्यवाही केली जात आहे. हिंगोली शहरात एका वाहन चालकास रविवारी ५००० हजार ५०० रुपयाच्या दंडाला सामोरे जावे लागले. त्यामुळे यापुढे वाहन चालविताना तसेच वाहन बाळगता चालक - मालक यांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. विना परवाना वाहन चालविल्यास ५ हजार रुपयाचा दंड असेल, वाहन चालविण्यास अपात्र असतानाही वाहन चालविल्यास १० हजारांचा दंड, विना वैद्य नोंदनी दुचाकी मालक २ हजार रूपये, विना वैद्य वीमा प्रमाणपत्र २ हजार रूपये, फॅनसी नंबर प्लेट १ हजार रूपये, विना हेल्मेट ५०० रूपये दंडासह परवाना रद्द चि कार्यवाही, भरधाव वाहन चालविणे ५ हजार रुपये, कणकर्श आवाज १ हजार रूपये, वेग मर्यादेचे उलांघन -४ हजार, रुग्णवाहिका अग्नीशामक वाहनाला अडथळा निर्माण करणे १० हजार रुपयाचा दंड लावला जाणार आहे. ही कार्यवाही ई - चलान प्रणालीद्वारे सुध्दा केली जाते आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dNcfMS
https://ift.tt/3s22JO6
0 Comments