name plate

name plate

पावसाने मुड ऑफ केला तरी भारताला विजयासाठी संधी; फक्त ही एक गोष्ट करावी लागले

सेंच्युरियन: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि पहिल्या दिवशी ३ विकेटच्या बदल्यात २७२ अशी धावसंख्या उभी केली होती. पण दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकता न आल्याने भारतीय संघाकडे आलेली चांगली संधी वाया गेली. सामन्यात अद्याप ३ दिवसांचा खेळ शिल्लक आहे. भारताला विजय मिळवायचा असेल तर काय करावे लागले जाणून घेऊयात... वाचा- रुग्णालयात भारताला या कसोटी सामन्यात चांगली सुरूवात मिळाली आहे. आता ही संधी भारतीय खेळाडू सोडणार नाहीत. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी पहिल्या सारखी राहिली नाही. त्यामुळे भारताने पहिला डाव ३५० ते ४०० धावांवर घोषित केला तरी यजमान दक्षिण आफ्रिकेवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे पावसामुळे जरी एका दिवसाचा खेळ झाला नसला तरी सामन्याचा निकाल अजूनही लागू शकतो आणि तो भारताच्या बाजूने लागण्याची शक्यता अधिक आहे. वाचा- आज मंगळवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही तर मात्र मॅचचा निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. दोन दिवसाचा खेळ वाया गेला तर मात्र ३ डावांची खेळ होणे अवघड ठरते. भारताकडे अजून एकपर्याय म्हणजे, वेगाने ४००च्या जवळपास धावसंख्या करून दक्षिण आफ्रिकेला दोन वेळा बाद करणे होय. वाचा- मोठा पाऊस जरी झाला तरी त्याचा खेळपट्टीवर अधिक परिणाम होणार नाही. कारण खेळपट्टीसोबत त्याच्या आजूबाजूचा परिसर देखील झाकला जातो. यामुळे खेळपट्टी बिघडणार नाही. तरी थोडा ओलावा असू शकतो. यामुळे जेव्हा पुन्हा खेळ सुरू होईल तेव्हा फलंदाजांना बॅटिंग करणे अवघड होऊ शकते. अधिक पाऊस झाल्यास फिरकीपटूंना अधिक संधी मिळू शकणार नाही. तसेच ही सेंच्युरियनवर वेगवान गोलंदाजांच्या जोरावर सामने जिंकले जातात.


from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/32FIxXw
https://ift.tt/3ECjbqS

Post a Comment

0 Comments