name plate

name plate

PM मोदी वाराणसीत आज घेणार 'शाळा', १२ मुख्यमंत्री देणार रिपोर्ट

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. पीएम मोदी आज यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपशासित राज्यांच्या १२ मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. मात्र, त्याआधी हे सर्व मुख्यमंत्री काशी विश्वनाथ कॉरिडॉरला पोहोचणार आहेत. पंतप्रधान मोदी दिवसभरात या सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतील आणि त्यांच्याकडून त्यांच्या राज्यांमध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतील. पंतप्रधान मोदींनी या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत काल रात्रीही बैठक घेतली. क्रूझवर सर्व मुख्यमंत्र्यांशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. १२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची 'शाळा' घेणार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू, गोव्याचे प्रमोद सावंत, गुजरातचे भूपेंद्र पटेल, हरयाणाचे मनोहर लाल खट्टर, हिमाचल प्रदेशचे जय राम ठाकूर, उत्तराखंडचा पुष्कर सिंग धामी, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे बसवराज बोम्मई, मणिपूरचे एन. बीरेन सिंग आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव हे उपस्थित असतील. बिहार आणि नागालँडचे उपमुख्यमंत्रीही सहभागी होणार वाराणसीत होणाऱ्या या परिषदेत बिहार आणि नागालँडचे उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदींसोबत सर्व १२ मुख्यमंत्र्यांची ही बैठक सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. ही बैठक दुपारी ३ वाजेपर्यंत चालणार आहे. पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसोबत दुपारचे जेवणही घेणार आहेत. पंतप्रधान मोदींसोबतची मुख्यमंत्र्यांची ही परिषद खास असेल. कारण ज्या राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत, पंतप्रधान मोदींना तेथील कामाचा रिपोर्ट दिला जाणार आहे. १२ राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या कामाबद्दल सांगतील आणि पंतप्रधानांसमोर त्यांचे सादरीकरण करतील. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक वेळ देण्यात आला आहे. सुशासनावर होणार चर्चा सर्व १२ मुख्यमंत्र्यांना सुशासनाच्या संदर्भात ते त्यांच्या राज्यात काय काम करत आहेत हे पंतप्रधानांना सांगतील. याशिवाय सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यात सुरू असलेल्या मोठ्या योजनांची माहिती द्यावी लागेल. वाराणसीत सोमवारी काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनानंतर संध्याकाळी हे सर्व मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गंगा आरतीच्या वेळी उपस्थित होते. राज्यात भाजपचे सरकार आहे, त्या प्रत्येक राज्याच्या विकासकामांवर आपली नजर आहे, असा संदेश पंतप्रधान मोदींना या परिषदेतून द्यायचा आहे. त्यामुळेच आजच्या सभेसाठी सर्व मुख्यमंत्र्यांनी विशेष तयारी केली आहे.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EVoYc2
https://ift.tt/3dNeDmu

Post a Comment

0 Comments