नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांना पुरस्कार जाहीर करण्यात आल्यानंतर काँग्रेसमधील एका गटाकडून त्यावर टीका केली जात असतानाच काँग्रेसचा महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेनेने या वादात उडी घेत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण देण्याच्या केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयाचे अगदी स्पष्ट शब्दांत शिवसेनेने समर्थन केले आहे. भारत सरकारने मंगळवारी पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यातील दोन नावांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री, माकपचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद ही ती दोन नावे आहेत. यापैकी बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही तासांतच निवेदन जारी करत पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे तर गुलाम नबी यांनी मात्र अशी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. पुरस्काराबाबत अद्याप ते काहीही बोललेले नसले तरी शुभेच्छांचा ते स्वीकार करत आहेत. ट्वीटरवर शुभेच्छा देणाऱ्या नेत्यांना रिप्लायही देत आहेत. त्यात काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री यांच्या ट्वीटने वादाची ठिणगी पडली आहे. बुद्धदेव यांच्या निर्णयाकडे बोट दाखवत त्यांनी गुलाम नबी यांना लक्ष्य केले आहे. 'बुद्धदेव भट्टाचार्य यांनी योग्य निर्णय घेतला. त्यांना 'गुलाम' व्हायचे नाही, 'आझाद' राहायचे आहे', असे ट्वीट रमेश यांनी केले आहे. त्यावरच शिवसेनेच्या राज्यसभा सदस्य यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'पद्मभूषण हा आपल्या देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान स्वीकारण्यास नकार दिला म्हणून एखाद्याला 'आझाद' म्हणणं आणि सन्मान स्वीकारला म्हणून एखाद्याला 'गुलाम' ठरवणं योग्य नाही. यातून राष्ट्रीय सन्मानाबाबतचे तुमचे विचार किती वरवरचे आहेत हे दिसून येते', अशा शब्दांत प्रियांका चतुर्वेदी यांनी जयराम रमेश यांच्या ट्वीटचा समाचार घेतला. विरोधी पक्षातील नेत्याच्या कार्याचा गौरव करण्याची ही काही पहिली आणि शेवटची वेळ नाही. त्यामुळे कृपा करून राजकीय प्रगल्भता दाखवा आणि या सन्मानाची प्रतिष्ठा राखा, असे आवाहनही गुलाम नबी आझाद यांना लक्ष करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना चतुर्वेदी यांनी केले.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3u2KA3O
https://ift.tt/3KWlEB4
0 Comments