नवी दिल्ली: भारतात व्हेरिएंटमुळे धडकली असून सध्या रुग्णंसंख्येचा उद्रेक पाहायला मिळत आहे. रविवारी देशात ३ लाख ३३ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली होती तर गेल्या २४ तासांत ३ लाख ६ हजार रुग्णांची भर पडली आहे. ही स्थिती पाहता तिसऱ्या लाटेने पीकचा टप्पा गाठल्याचे दावे केले जात असतानाच येथील संशोधकांनी मात्र वेगळे मत मांडले आहे. त्यानुसार पुढील १४ दिवसांत करोनाची तिसरी लाट पीक गाठेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ( ) वाचा : करोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्येने पीक गाठला आहे की नाही यावरून मतमतांतरे आहेत. त्यात आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी करोनाबाबतच्या एकूण स्थितीचा अभ्यास करून काही तर्क मांडले आहेत. त्यानुसार पुढील १४ दिवसांत ६ फेब्रुवारीपर्यंत करोना बाधित रुग्णांची संख्या या लाटेतील उच्चांक गाठू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान तिसरी लाट पीकच्या टप्प्यावर असेल असे सांगण्यात आले होते. वाचा : आयआयटी मद्रासच्या संशोधकांच्या मते, भारतात सलग दोन आठवडे आर-व्हॅल्यूचा टक्का खाली येताना दिसत आहे. करोना संसर्ग फैलावण्याचा दर यातून दर्शवला जातो. १४ ते २१ जानेवारी या दरम्यान आर व्हॅल्यू १.५७ पर्यंत खाली आली आहे. ७ ते १३ जानेवारी दरम्यान आर-व्हॅल्यू २.२, १ ते ६ जानेवारी दरम्यान आर-व्हॅल्यू ४ तर २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान हे प्रमाण २.९ टक्के होते. यात होत असलेली घसरण हे चांगले संकेत मानले जात आहेत. आर-व्हॅल्यू म्हणजे काय? एक करोना बाधित व्यक्ती किती जणांना संक्रमित करू शकते हे आर-व्हॅल्यूनुसार निश्चित केले जाते. जर आर व्हॅल्यू एक असेल तर बाधित व्यक्ती आणखी एका व्यक्तीला संक्रमित करण्याची भीती असते. एखाद्या करोना बाधित व्यक्तीची आर-व्हॅल्यू तीन असेल तर त्याच्यामुळे आणखी तीन जणांना संसर्गाची लागण होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. वाचा: मुंबई, कोलकाताला मोठा दिलासा आयआयटी मद्रासचे प्राध्यापक नीलेश एस. उपाध्याय आणि प्राध्यापक एस. सुंदर यांच्या अध्यक्षतेखाली हे संशोधन करण्यात आले. यात सध्या मुंबईत ०.६७, दिल्लीत ०.९८, चेन्नईत १.२ तर कोलकाता येथे ०.५६ असे आर-व्हॅल्यूचे प्रमाण आढळून आले आहे. ही आकडेवारी लक्षात घेता आणि कोलकाता या दोन्ही शहरांत तिसऱ्या लाटेचा पीकचा टप्पा समाप्त झाल्याचे दिसत आहे तर दिल्ली आणि चेन्नई त्याच्या उंबरठ्यावर आहे, असे आयआयटी मद्रासच्या गणित विभागाचे सहप्राध्यापक डॉ. जयंत झा यांनी सांगितले. आयसीएमआरने करोना बाधिताच्या संपर्कातील लक्षणे नसलेल्या व्यक्तींची करोना चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे. कदाचित त्यामुळे रुग्णसंख्या अपेक्षेपेक्षा कमी दिसत असावी, असे मतही त्यांनी नोंदवले. वाचा :
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qXERKo
https://ift.tt/3IwSExx
0 Comments