कोहलीने डावाच्या सुरुवातीला सावध फलंदाजी केली. पहिल्या ११ चेंडूत कोहलीने १० धावा केल्या. डावाच्या सहाव्या षटकात कोहलीला गती मिळाली. त्याने मुजीब उर रहमानच्या षटकात २ चौकार आणि एक षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. यानंतर कोहलीने मागे वळून पाहिले नाही. अर्धशतकानंतर कोहलीने दिमाखदार फटकेबाजी करत शतकाकडे कूच केलं. जसजसं तो शंभरीच्या जवळ पोहोचत होता, तसंतसं करोडो फॅन्सच्या हृदयाचे ठोके वाढत होते. पण विराटने यावेळी कुठलीही चूक केली नाही.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/iH426yk
https://ift.tt/9pVAP8d
0 Comments