
नवी दिल्ली: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने अनेक मोठे विजय साकारले आहेत. फक्त भारतात नाही तर विदेशात देखील प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने केली आहे. पण भारताला आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत कधीच विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळेच येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत विजय मिळवून इतिहास घडवायचा आहे. वाचा- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बहुप्रतिक्षित अशा कसोटी मालिकेच्या आधी आफ्रिकेचा माजी जलद गोलंदाज एलन डोनाल्डने विराट कोहलीच्या २०१८ मधील एका वाक्याची आठवण करून दिली आहे. डोनाल्डने सांगितले की, विराट कोहलीच्या त्या एका वाक्याने भारतीय संघा नवी उर्जा आली आणि टीम इंडियाच्या कामगिरीत जबरदस्त बदल झाला. वाचा- क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना डोनाल्ड म्हणाला, विराटने काही वर्षांपूर्वी म्हटले होते की, जर तुम्ही घराच्या बाहेर जिंकू शकत नसाल तर तुम्हा उल्लेख कधीच एक महान संघ म्हणून केला जाणार नाही. त्याच्या या वाक्यानंतर भारतीय संघाने खरोखर असे काम करून दाखवले. फक्त ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक मारली. टीम इंडिया एक उच्च दर्जा असलाला संघ असल्याचे मला दिसते, असे डोनाल्ड म्हणाला. वाचा- भारताने सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियाला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत टीम आघाडीवर होती. भारताने दक्षिण आफ्रिकेत अद्याप एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. पण विराट आणि कंपनी यावेळी हा इतिहास बदलू शकते. डोनाल्ड म्हणाला, दोन्ही संघात आगामी कसोटी मालिकेत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. भारताच्या जलद गोलंदाजांसमोर आफ्रिकेच्या फलंदाजांची खरी परीक्षा असणार आहे. दोन्ही संघात शानदार खेळाडू आहेत. मजबूत गोलंदाजी असल्याने फलंदाजांची खरी परीक्षा असेल. आफ्रिकेने गेल्या काही मालिकेत मुख्य खेळाडू गमावले आहेत. संघात युवा खेळाडू आहेत आणि त्यांना भारतीय गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3sB0stt
https://ift.tt/3mt9yEE
0 Comments