name plate

name plate

रवी शास्त्री देखील विराटच्या विरोधात; म्हणाले, वनडेचा कर्णधार रोहितच हवा

नवी दिल्ली: विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचे प्रकरण चांगल्या पद्धतीने हाताळता आले असते, असे मत टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक यांनी व्यक्त केले. वनडे कर्णधारपदावरून झालेल्या गोष्टींवर विराटने त्याचे मत स्पष्टपणे सांगितले, आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बोलण्याची वेळ आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याआधी वनडे कर्णधारपदावरून विराटने केलेले वक्तव्य आणि गांगुलीने केलेले वक्तव्य वेग वेगळे होते. वाचा- डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला गांगुलीने असे म्हटले होते की, बीसीसीआयने विराटला विनंती केली होती की त्याने टी-२०चे कर्णधारपद सोडू नये. पण त्याने ऐकले नाही. पण आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने असे काही झाले नसल्याचे म्हटले. इतक नव्हे तर वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय त्याला घोषणेच्या दीड तास आधी सांगण्यात आला, असे त्याने म्हटले. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना शास्त्री म्हणाले, विराटने स्पष्टपणे जे होते ते सांगितले आता बोर्डाच्या अध्यक्षांनी बोलले पाहिजे. चांगला संवाद परिस्थितीला अधिक चांगले करू शकते. वाचा- शास्त्रींनी गांगुली विरुद्ध विराट या वादावर वक्तव्य करताना वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा असला पाहिजे असे म्हटले. रोहित आता टी-२०चा कर्णधार झाला आणि मर्यादित षटकाचा कर्णधार तेच असला पाहिजे. विराटने टी-२०चे कर्णधारपद सोडले. तेव्हाच रोहितसाठी मार्ग मोकळा झाला. आता तोच मर्यादित षटकाचा कर्णधार हवा. विराटने वर्ल्डकपनंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्याने वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व करणार असल्याचे म्हटले होते. पण बीसीसीआय आणि निवड समितीला मर्यादीत षटकासाठी एकच कर्णधार हवा होता. वाचा- हा कसोटीतील सर्वोत्तम कर्णधार आहे. याबाबत कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही की विराटच कसोटीचा कर्णधार असला पाहिजे. तुम्हा पाहू शकता त्याने काय केले आहे. कोणताही कर्णधार संघात अशा पद्धतीने उर्जा निर्माण करू शकत नाही. याच बरोबर विराट आणि माझे संबंध खुप चांगले असल्याचे शास्त्री यांनी सांगितले.


from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3JfMjrr
https://ift.tt/3H7LsqV

Post a Comment

0 Comments