name plate

name plate

'एकवेळ पहिला सामना ड्रॉ होईल, पण टीम इंडिया जिंकणार नाही' भारताच्या खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य...

सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना ड्रॉ होईल, पण टीम इंडिया हा सामना जिंकू शकणार नाही, असे धक्कादायक वक्तव्य भारताच्या एका खेळाडूने केले आहे. त्याचबरोबर या खेळाडूने ही मालिका कोण जिंकेल, याचेही भाकित केले आहे. नेमकं काय म्हणाला का क्रिकेटपटू, पाहा...दक्षिण आफ्रिकेबरोबरचा पहिला सामना २६ डिसेंबरपासून सुरु होणा आहे. या सामन्याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, " दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिला कसोटी सामना जिंकण्याची जास्त आहे. माझ्यामते हा सामना दक्षिण आफ्रिका ५१ टक्के जिंकू शकते, तर भारताला तेवढी संधी नसेल. माझ्यामते हा सामना ड्रॉ होऊ शकतो. कारण या सामन्यात पावसाची शक्यता जास्त आहे. पण जर सामन्यातील दोन्ही डाव झाले तर माझ्यामते हा सामना जिंकण्याची सर्वात जास्त शक्यता दक्षिण आफ्रिकेला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात चांगला समन्वय आहे आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी होत आहे. विश्वचषकातही आपण पाहिले की, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू संघातील साथ्न टिकवण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. त्यामुळे आपले स्थान मजबूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ सज्ज झालेला असेल. त्यामुळे पहिला सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघच प्रबळ दावेदार आहे." मालिका विजयाबद्दल आकाश चोप्रा नेमकं काय म्हणाला, पाहा...मालिका विजयाबाबत आकाश म्हणाला की, " माझ्यामते ही मालिका जिंकण्याची सर्वात जास्त संधी ही दक्षिण आफ्रिकेला आहे. माझ्यामते दक्षिण आफ्रिकेचा संघ ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकू शकते. एनरिच नॉर्किया हा दक्षिण आफ्रिकेसाठी हुकमी एक्का ठरू शकतो. जर नॉर्किया खेळला तर दक्षिण आफ्रिकेचा संघ २-१ अशी मालिका जिंकेल. पण जर नॉर्किया खेळणार नसेल तर ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटू शकते. पण ही मालिका भारतीय संघ जिंकेल, असे मला वाटत नाही. त्यामुळे भारताला या मालिकेत इतिहास रचता येईल, असे मला वाटत नाही."


from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3eo9WQt
https://ift.tt/3yW0PQC

Post a Comment

0 Comments