
सेंच्युरियन: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने दमदार सुरूवात केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने ३ बाद २७२ अशी धावसंख्या केली होती. भारताकडून सलामीवीर केएल राहुलने नाबाद १२२ धावा केल्या आहेत तर अजिंक्य रहाणे ४० धावांवर खेळत आहे. दुसऱ्या दिवशी टीम इंडिया मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न करले. पहिला दिवस भारताचा ठरला असला तरी अशी एक घटना घडली ज्यामुळे टीम इंडियाचे मोठे नुकसान झाले. वाचा- किती संधी देणार विराट कोहलीने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताच्या सलामीवीरांनी कर्णधाराला निराश केले नाही. केएल राहुल आणि यांनी शतकी भागिदारी केली. ही जोडी द्विशतकापर्यंत जाईल असे वाटत होते तेव्हाच लुंगी एगिडीच्या चेंडूवर मयांक बाद झाला. एगिडीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. चेंडू थोडाचा बॅक ऑफ लेंथ होता आणि तो अग्रवालच्या पॅडला थोडा वरच्या बाजूला लागला. मैदानावरील अंपायर अइरेसमस यांना वाटले की चेंडू विकेटला मिस करतोय. डीन एल्गरने अपील केली आणि रीप्लेमध्ये देखील असेच दिसत होते की चेंडू विकेटला मिस करत आहे. त्यानंतर बॉल ट्रॅकिंगद्वारे पाहण्यात आले. बराच वेळ विचार केल्यानंतर असे चेंडू लेग स्टंपच्या बाहेरच्या बाजूला स्पर्श करतोय. याचा अर्थ निर्णय घेताना अंपायर्स कॉलचा विचार केला पाहिजे होता. चेंडू विकेटच्या अर्थ्या पेक्षा अधिक भागाला लागत नव्हती. वाचा- वाचा- मैदानावरील अंपायर इरेसमस यांना देखील धक्का बसला जेव्हा त्यांना स्वत:चा निर्णय बदलावा लागले. मयांक अग्रवालला बाद देण्यात आले. याची निराशा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. मयांक चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने १२३ चेंडूत ९ चौकारांसह ६० धावा केल्या होत्या. दुसऱ्या सत्रात मयांकने नक्कीच शतक केले असते. पण त्याआधी त्याला अशा पद्धतीने बाद दिले गेले. मयांकच्या बाद होण्यावरून सोशल मीडियावर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. युझर्सनी स्क्रीनशॉट शेअर करून आता बॉल ट्रॅकिंग देखील भरवश्याचे राहिले नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. वाचा- वाचा- अग्रवालने देखील या निर्णयामुळे दु:खी झाल्याचे म्हटले. त्याच बरोबर मला यावर प्रतिक्रिया देण्याची परवानगी नाही. हा जर मला संबंध खराब करायचे असतील आणि दंड करून घ्यायचा असेल तर मी असे करू शकतो. ज्या गोलंदाजाने मयांकला बाद केले त्या लुंगी एगिडीने देखील यावर मत व्यक्त केले. मझ्या मते ती एक चांगली अपील होती. मला वाटले होते की अंपायर्स कॉल असेल. निर्णय घेण्यास वेळ लागला पण यावर प्रत्येकाला संशय वाटला. या घनटेवर मैदानावरील अंपायर्स प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत. मात्र आता बॉल ट्रॅकिंग देखील एक वादाचा विषय झाला आहे.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3mCPpwd
https://ift.tt/3EtTau0
0 Comments