
मुंबई- अभिनेत्री ही मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेता नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती पहिल्यांदा चर्चेत आली होती. चार वर्षांच्या संसारानंतर यावर्षी दोघांनी ऑक्टोबर महिन्यात विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. सामंथा आणि नागा चैतन्य विभक्त झाल्या नंतर अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणत ट्रोल करण्यात आले होते. या ट्रोलिंगचे तिने वेळोवेळी उत्तरही दिलं आहे, परंतु अशातच तिला एका युझरने जाणीवपूर्वक ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. सामंथानेही अगदी चोख शब्दात यूझरला उत्तर देत त्याची बोलती बंद केली. १७ डिसेंबर रोजी अभिनेता अल्लू अर्जुन याचा पुष्पा द राईस हा चित्रपट रिलीज झाला असून यात सामंथाचे 'ऊ अंतवावा' हे आयटम सॉंग आहे. ट्रोलर्सनी याच गाण्याचे शब्द सोशल मीडियावर पोस्ट करत तिला ट्रोल केलं. या पोस्टमध्ये त्याने सामंथाला उद्देशून लिहिलं की सामंथा ही एक घटस्फोटीत, उद्ध्वस्त आणि दुराग्रही महिला आहे जिने नागा चैतन्यचे ५० कोटी रुपये लुटले. यावर सामंथाने खूप समजूतदारपणे उत्तर दिलं असून नेटकऱ्यांनी तिच्या या उत्तराचं कौतुक केलं आहे. सामंथाने यूझरच्या ट्रोलला उत्तर देताना लिहिलं की, 'देव तुमच्या आत्म्याला आशीर्वाद देवो' म्हणजे देव तुमचं रक्षण करो. सामंथाचं हे ट्वीट आता व्हायरल होत आहे. दरम्यान, सामंथाच्या ट्वीटनंतर कमारली दुकानदारने ट्वीट डिलीट केलं. पतीपासून विभक्त झाल्यानंतर सामंथाने सोशल मीडियावर तिच्या विरोधात चुकीच्या गोष्टी लिहिणाऱ्यांवर टीका केली होती. ती म्हणाली होती की, 'जेव्हा महिलांच्या बाबतीत प्रश्न येतो तेव्हा तिच्यावर अनेक नैतिकतेचे प्रश्न उपस्थित केले जातात,पण एक समाज म्हणून पुरुषांच्या नैतिकतेवर कधी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणार की नाहीत?' दरम्यान, सामंथा आणि नागा चैतन्य यांनी २ ऑक्टोबर रोजी घटस्फोट घेतला होता. २०१७ साली ते लग्न बंधनात अडकले होते. त्यानंतर चार वर्षांच्या संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता.
from Entertainment News in Marathi: Celebrity News and Gossips Online | Maharashtra Times https://ift.tt/3qncow3
https://ift.tt/3H6j0pt
0 Comments